You are currently viewing धरित्रीची कहाणी

धरित्रीची कहाणी

एका आटपाट नगरात एक ब्राह्मण राहात असे. 

त्याची स्त्री धरित्रीमातेचं चिंतन करी, वंदन करी, पूजा करी – ‘धरित्रीमाय तूच थोर. तूच समर्थ. काकाणं भरलेल्या लेकी दे, मुसळकांड्या दासी दे, नारायणासारखे पाच पुत्र दे, दोन कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे.’ 

असा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा; माघी तृतीयेला संपूर्ण करावा. 

सहा रेघांचा चंद्र काढावा. सहा रेघांचा सूर्य काढावा. सहा गायींची पावलं काढून त्यांची रोज पूजा करावी. 

संपूर्णाला घरची बालसून जेवू घालावी. कोश करा, पांढरा दोरा, चोळी-पाळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. 

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा